सहा हजार ६५२ गोविंदांना विमा कवच
वसई, ता. १२ (बातमीदार) : दहीहंडीनिमित्त गोविंदाचा थरार १६ ऑगस्टला रंगणार आहे. या गोविंदांना सुरक्षा मिळावी, म्हणून वसई-विरार महापालिकेने त्यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत एकूण सहा हजार ६५२ गोविंदांनी नोंदणी केली आहे.
वसई-विरार शहरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात सादर करण्यात येतो. मानाच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा होते. गल्लोगल्ली गोविंदांचा उत्साह पाहवयास मिळतो, मात्र यादरम्यान दुर्घटना झाल्याने दुखापत होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, म्हणून वसई-विरार महापालिकेने गोविंदांना विमा कवच दिले आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. अनेक पथकांतील गोविंदांनी प्रशासनाकडे अर्ज व नोंदणी केली आहे. त्यानुसार त्यांना विमा कवच देण्यात आले आहे.
महापालिका क्रीडा विभागाने एकूण ९९ पथकांतील सहा हजार ६५२ गोविंदांचा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत विमा काढण्यात आला. विम्यासाठी अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून १७ ऑगस्ट सकाळी सहा वाजेपर्यंत लागू राहील. गोविंदांना विमा संरक्षण मिळाले, तरी उत्सवाच्या ठिकाणी दहीहंडी उत्सव आयोजकांनी गोविंदांच्या सुरक्षेच्या सर्व उपाययोजना कराव्यात. कोणालाही दुखापत होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन महगपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.