आक्षी-साखर गावाला उधाणाचा धोका

आक्षी-साखर गावाला उधाणाचा धोका

Published on

आक्षी-साखर गावाला उधाणाचा धोका
धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी
अलिबाग, ता. १२ (वार्ताहर) ः तालुक्यातील आक्षी व साखर गावातील समुद्रकिनारी राहणाऱ्या ग्रामस्थांना उधाणाचा धोका वाढला आहे. त्यामुळे या गावातील समुद्रकिनारी प्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून शासनाकडे करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, आपत्कालीन परिस्थितीत या गावांना पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता वाढली आहे, अशी माहिती सरपंच रश्मी पाटील यांनी दिली.
अलिबाग तालुक्यातील आक्षी हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे गाव आहे. अलिबाग शहरापासून पाच किमी अंतरावर समुद्रकिनारी हे गाव वसलेले आहे. यामुळे मासेमारी करणारा वर्गही आक्षी व साखर या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. किनाऱ्यावरील या गावांना भविष्यात उधाणाचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. धूप प्रतिबंधक बंधारा उभारण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात धूळखात आहे. अद्याप प्रशासनाकडून योग्य दखल घेतली गेली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केले आहे.
आक्षी सरपंच रश्मी पाटील यांनी सांगितले, की वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. जर बंधारा बांधला नाही तर समुद्रातील पाणी गावात शिरून पूरस्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. सतत उधाणाच्या वाढीसोबतच लाटांच्या माऱ्यामुळे किनाऱ्याची धूप होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com