परीक्षेची पारदर्शकता धोक्यात
अंबरनाथ, ता. १३ (वार्ताहर) : परीक्षेच्या वेळी गैरहजर विद्यार्थ्यांची परीक्षा शाळेत हजर विद्यार्थ्यांकडून लिहून घेतल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आला आहे. हा प्रकार एस. निजलिंगप्पा शाळेत घडल्याचा आरोप काही पालकांनी केला असून, या प्रकरणाची चौकशी करून दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अंबरनाथ पश्चिम येथील पालक शंकर गड्डम यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मुलांकडून शाळेत अनुपस्थित विद्यार्थ्यांचे पेपर लिहून घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकार समजल्यावर गड्डम यांनी शाळा प्रशासनाला विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी रीतसर तक्रार नोंदवली आहे. या प्रकारामुळे मेहनती विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून, हुशार विद्यार्थ्यांच्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परीक्षेची पारदर्शकता आणि शैक्षणिक प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोषींवर कारवाई होणार
शाळेचे संस्था अध्यक्ष तिलक चलवादी आणि सचिव बसवंत पुजारी यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, अशा प्रकारची तक्रार आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. मात्र, हे प्रकरण गंभीर असून यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.