भाजपकडून मतांची चोरी हे देशावरचे आक्रमण!

भाजपकडून मतांची चोरी हे देशावरचे आक्रमण!

Published on

भाजपकडून मतांची चोरी हे देशावरचे आक्रमण!
- सचिन सावंत यांचा आरोप

भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : भाजपकडून करण्यात आलेली मतांची चोरी हे देशावरचे अतिक्रमण आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी मिरा रोड येथे केला. आता दुसरा स्वातंत्र्यलढा लढण्याची वेळ आमच्यावर आली असून, काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई लढत राहील, असे सावंत यांनी या वेळी सांगितले.
सचिन सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, की पंतप्रधानांसहित भाजपच्या सर्व नेत्यांकडून लोकशाहीवर आक्रमण केले जात आहे. देशाचा सर्वधर्मसमभावाचा जो पाया आहे तोच उद्ध्वस्त केला जात आहे. सत्ता कायमची आपल्याकडे राहावी यासाठी देशाचे वाटोळे करण्याचे काम भाजप करीत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस याविरोधात रस्त्यावरची लढाई लढत राहील. पक्षाने याविरोधात आंदोलनाची दिशा ठरवली आहे. मशाल यात्रेद्वारे हा मुद्दा जनतेसमोर नेणार आहोत, असेही सावंत यांनी सांगितले. भाजपने निवडणूक आयोगाच्या नियुक्तीचे नियम बदलले. बहुमत हे सरकारचेच असेल हे पाहण्यात आले. त्यामुळे मोदी सरकारच्या आदेशावर चालणे हे आयोगाचे कर्तव्य झाले आहे. मतदाराचा अधिकार हा लोकशाहीचा गाभा आहे. मात्र हा अधिकारच चोरण्याचा प्रयत्न होत असेल, तर यापेक्षा गंभीर बाब दुसरी असणार नाही. त्यामुळे या देशाचे सरकार जनसामान्यांच्या मताने आले आहे की मतांची चोरी करून आले आहे, असा सवाल सावंत यांनी या वेळी केला. या वेळी काँग्रेसचे प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन, मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com