अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सज्ज

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सज्ज

Published on

वसई, ता. १८ (बातमीदार) : हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्यासाठी गुरुवार (ता. २१)पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. वसई-विरार महापालिका क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून, अतिवृष्टीमुळे काही सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता. १८) पालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत व अन्य अधिकारी उपस्थित होते.

गेले दोन दिवस महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. पालिकेकडील ५४ संक्शन पंपांचा आवश्यकतेप्रमाणे वापर सुरू असून, पावसाचे पाणी साचून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी दोन हजारांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. वैद्यकीय आरोग्य यंत्रणा तत्पर ठेवणे, पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे व पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण वेळोवेळी करणे अशा विविध सूचना आयुक्तांनी दिल्या.

मदतीसाठी संपर्क
आपत्ती काळात अग्निशमन विभागही सुसज्ज ठेवण्यात आला आहे. पालिकेचे मुख्य आपत्ती व्यवस्थापन केंद्रासह (संपर्क क्र. ०२५०-२३३४५४६, २३३४५४७, ७०५८९१११२५) तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास सुरू असून, नागरिकांनी आपत्तीच्या काळात मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com