सोसायट्यांमध्ये पाण्याचा शिरकाव

सोसायट्यांमध्ये पाण्याचा शिरकाव

Published on

बोळिंज (बातमीदार) : मुसळधार पावसामुळे गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमांमध्ये अडचणी आल्या होत्या. सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततदार सुरू असून सोसायटीमध्ये आणि सकल भागांमध्ये पाणी साचले आहे.

नागरिकांना प्रवास करण्यास त्रास होत आहे. सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सकल भागांमध्ये असलेल्या सोसायटीमध्ये पाणी साचले आहे. विरार पश्चिमेतील विराट नगर, जकात नाका, नालासोपारा पूर्वेतील शिर्डीनगर, गालानगर, तसेच युनिटेक कॉम्प्लेक्स या ठिकाणी पाणी साचले आहे. विरार पश्चिममधील अनेक परिसरांमध्ये रस्ता उंचावण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी नसून थेट सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे.

पाण्यातून बाप्पाची मिरवणूक
गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असून सर्वत्र सार्वजनिक गणपतीची आगमन सोहळे सुरू झाले आहेत. रविवारी मोठ्या प्रमाणात मूर्ती आगमन सोहळे आयोजित करण्यात आले होते. पावसामुळे मुख्य रस्त्यांवर पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यातूनच मंडळांना मूर्तीचे आगमन करावे लागले. मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती, तसेच मिरवणूक काढत असताना मंडळांना त्रास सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com