देहर्जे नदीला पूर आल्याने अनेक गाव संपर्काबाहेर

देहर्जे नदीला पूर आल्याने अनेक गाव संपर्काबाहेर

Published on

विक्रमगड, ता. १९ (बातमीदार) : दोन दिवस सतत पडत असलेल्या संततधार पावसामुळे विक्रमगड तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळित झाले. तालुक्याच्या मध्य भागातून वाहत असलेल्या देहर्जे नदीला पूर आल्याने छोटे पूल पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला.

ब्राह्मणगाव आणि कुर्झे या गावांदरम्यान देहर्जे नदीवर असलेल्या पुलावर पाणी वाहत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. शिळ-देहर्जे गावादरम्यान असलेल्या देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. विक्रमगड-मनोर मार्गावरील पाचमड पूलही पाण्याखाली गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तसेच तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा काही काळ संपर्क तुटला. शिळ-देहर्जे, ब्राह्मणगाव आणि कुर्झे या दोन्ही पुलांच्या उंचीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मुसळधार पावसामुळे दरवर्षी पाण्याखाली जाणाऱ्या दोन्ही पुलांची उंची वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पावसाने भातशेतीदेखील दोन दिवस पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले असून, भातावर रोग पसरण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. आणखी एक ते दोन दिवस पाऊस असाच चालू राहिल्यास भातपीक कुजण्याची चिंता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com