चोर नव्हे, फिर्यादीच झाले होते गायब
पोलिसांनी ३० वर्षांनी परत केला चोरीचा ऐवज
ठाणे शहर, ता. २२ (बातमीदार) : पोलिस फक्त गुन्हेगारांनाच नव्हे, तर चोरीला गेलेल्या वस्तूंच्या मालकांचाही शोध घेऊ शकतात, हे ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी दाखवून दिले आहे. ३० वर्षांनंतर पोलिसांनी दोघा तक्रारदारांचा शोध घेऊन त्यांचा चोरी गेलेला ऐवज त्यांना परत केला आहे.
१९९८ आणि १९९९ मध्ये सावरकरनगर येथे राहणाऱ्या उषा शेट्टी आणि इंगळे यांच्या घरी चोरी झाली होती. पोलिसांनी आरोपींना अटक करून चोरलेले दागिने जप्त केले; पण तक्रारदार मात्र सापडत नव्हते.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी हे जुने प्रकरण पुन्हा हाती घेतले. त्यांनी हवालदार संदीप सपकाळे आणि फिरोज सय्यद यांना फिर्यादींचा शोध घेण्याची जबाबदारी दिली. अथक प्रयत्नांनंतर त्यांना समजले, की उषा शेट्टी आता पनवेलला राहतात. तर दुसरे तक्रारदार इंगळे यांचे निधन झाले आहे. इंगळे यांच्या मुलीचा मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला आहे.
शेवटी पोलिसांनी दोघींनाही (इंगळे यांच्या मुलीसह) गुरुवारी (ता. २१) पोलिस ठाण्यात बोलावले आणि त्यांचे चोरीला गेलेले सोन्याचे दागिने परत केले. ३० वर्षांनंतर आपला ऐवज परत मिळाल्याने दोघींनीही पोलिसांच्या कामाचे खूप कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.