मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे
मुंबईकरांच्या समस्या प्राधान्याने सोडवा!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः पालिकेच्या माध्यमातून मुंबई महानगराचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे. विकासकामांबरोबरच मुंबईकरांना उच्च दर्जाच्या मूलभूत सेवासुविधा पुरविण्याची आग्रही भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे कौशल्य आणि मुंबई उपनगरे जिल्हा सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
पालिकेच्या एम पूर्व विभाग कार्यालयात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. २२) जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक आमदार अबू आझमी, स्थानिक आमदार सना मलिक, उपआयुक्त देविदास क्षीरसागर, एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त उज्ज्वल इंगोले आदी उपस्थित होते. या वेळी सुमारे दोनशेपेक्षा जास्त नागरिकांनी समस्या मांडल्या. प्रामुख्याने रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, सुशोभीकरण, घनकचरा व्यवस्थापन, अनधिकृत बांधकामे, सीसीटीव्ही बसविणे, जलवाहिनी बदलणे, सार्वजनिक प्रसाधनगृहांची उभारणी, इमारतींचा पुनर्विकास यांसारख्या विविध समस्यांचा यामध्ये समावेश होता. या समस्यांवर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश लोढा यांनी दिले. समस्या निराकरणात असलेल्या अडचणी जाणून घेऊन त्या लवकर सोडवाव्यात, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.