कोकणवासीयांना रेल्वेचा दिलासा

कोकणवासीयांना रेल्वेचा दिलासा
Published on

कोकणवासीयांना रेल्वेचा दिलासा
मुंबई-मडगाव वंदे भारत धावणार १६ डब्यांसह

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : गणेशोत्सव काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने यंदा विशेष तयारी केली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मडगावदरम्यान धावणाऱ्या ट्रेन क्रमांक २२२२९/३० वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आता आठऐवजी सोळा डब्यांसह धावणार आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हा बदल २५ ऑगस्टपासून लागू होणार आहे. २५, २७ आणि २९ ऑगस्ट रोजी सीएसएमटीहून सुटणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये हे वाढीव डबे जोडले जातील. तर २६, २८ आणि ३० ऑगस्ट रोजी मडगावहून सुटणाऱ्या गाडीत प्रवाशांसाठी सोळा डब्यांची सोय उपलब्ध असेल. या बदलांमुळे हजारो अतिरिक्त प्रवाशांना आरक्षणाची संधी मिळणार असून, कोकणात जाण्याचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. दरवर्षी गणेशोत्सव काळात कोकणात जाण्यासाठी लाखो प्रवासी रेल्वेचा वापर करतात; मात्र मर्यादित आसन क्षमता आणि गाड्यांमध्ये होणारी गर्दी यामुळे प्रवाशांचे हाल होतात. यंदा रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या, वाढीव डबे आणि अतिरिक्त सोयी उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये वाढवण्यात आलेले आठ अतिरिक्त डबे प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com