तळोजा भुयारी मार्गातील गळती रोखण्यासाठी रेल्वे सज्ज
तळोजा भुयारी मार्गातील गळती रोखण्यासाठी रेल्वे सज्ज
पाणी भरल्यामुळे बससेवा ठप्प; वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पाहणी
खारघर, ता. २५ (बातमीदार) ः तळोजा भुयारी मार्गातील वारंवार होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे येथील रहिवासी व विद्यार्थ्यांवर होणाऱ्या समस्यांकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष वेधले आहे. पनवेल येथील वरिष्ठ अधिकारी संजीव कुमार यांनी शुक्रवारी भुयारी मार्गाची पाहणी केली. पाहणीवेळी सामाजिक कार्यकर्ते राजीव सिन्हा आणि अंकुश गायकवाड उपस्थित होते.
पाच ते सहा वेळा पाणी भरल्यामुळे तळोजा वसाहतीतील नागरिकांना सुमारे तीन किलोमीटर अंतर पार करून पेंधर रेल्वे फाटक आणि उड्डाणपूल मार्गे ये-जा करावे लागते. यामुळे रहिवासी तसेच खारघर-तळोजा दरम्यान धावणाऱ्या एनएमएमटी बस सेवेवरसुद्धा परिणाम होता. त्यामुळे शीघ्र कृती सेंटर ते तळोजा वसाहतीदरम्यान नागरिकांना एक ते दोन किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. पाणी तुंबल्यामुळे स्थानिकांचे रोजचे प्रवासाचे वेळापत्रक ढासळते. विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि अडचणी भोगाव्या लागतात. दरम्यान ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास येताच पनवेल येथील रेल्वे कार्यालतील अधिकारी संजीव कुमार यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी संजीव कुमार यांनी सांगितले की, तळोजा भुयारी मार्गातील गळतीमुळे पाणी भरत आहे. पावसाळ्याच्या हंगामानंतर या गळतीला तातडीने रोखण्याचे काम केले जाईल. यामुळे भविष्यात पाणी तुंबणार नाही. आम्ही या दिशेने तत्परतेने उपाययोजना करणार आहोत. यावेळी प्रशासनाने तातडीने काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.