पालिकेच्या कामकाजाची कॅगद्वारे चौकशी करा
पालिकेच्या कामकाजाची कॅगद्वारे चौकशी करा
कल्याणमधील जागरूक नागरिकाची मुख्य न्यायाधीशांकडे मागणी
कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील गंभीर नागरी समस्यांनी पिचलेल्या कल्याणातील एका जागरूक नागरिकाने थेट सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांना पत्र लिहिले आहे. तसेच इथल्या नागरी समस्यांची कॅगद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे. निशित शहा असे या नागरिकाचे नाव असून, त्यांनी शुक्रवारी पोस्टाद्वारे हे पत्र पाठवून पालिकेच्या कामाची नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कमिटीमार्फत स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
देशाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांना पाठवलेल्या या पत्रात शहरातील दैनंदिन प्रमुख समस्या नमूद केल्या आहेत. त्यात शहर नियोजन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, वाढती-अनियंत्रित वाहतूक कोंडी, सार्वजनिक आरोग्य, अपुऱ्या पडणाऱ्या पायाभूत सुविधा अशा प्रमुख नागरी समस्यांचा उल्लेख केला आहे.
तसेच ‘‘आम्ही नियमित कर भरतो, प्रामाणिकपणे महसूल देतो; तरीदेखील चांगले रस्ते, योग्य आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा आदी मूलभूत सुविधा आम्हाला मिळत नाहीत. हे आमच्या हक्कांवर अन्याय असल्याची,’’ उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी यावर व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.