वकिलांच्या मंत्रालयीन प्रवेश वेळेत बदल करण्याची मागणी..

वकिलांच्या मंत्रालयीन प्रवेश वेळेत बदल करण्याची मागणी..

Published on

वकिलांच्या मंत्रालयीन प्रवेश वेळेत बदल करण्याची मागणी
मालाड, ता. २५ (बातमीदार) ः वकिलांचा मंत्रालयातील प्रवेश वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वकील सुभाष पगारे यांनी पत्र लिहीले आहे. पत्रकाराप्रमाणे वकीलांचीही प्रवेशवेळ निश्चित करण्याची मागणी पगारे यांनी पत्राद्वारे केली आहे.
राज्याच्या मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत डीजी प्रवेश हे ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. त्यावर नोंदणी करून अभ्यंगताना मंत्रालयात प्रवेश दिला जातो. हा प्रवेश निश्चित करण्यासाठी ॲप्लिकेशनमध्ये मंत्रालयात भेट देण्याचे वेगवेगळे प्रकार नमूद केले आहेत. त्यामध्ये पत्रकार, दिव्यांग व इतर लोकांना भेट देण्याचे प्रकार नमूद आहेत. यामध्ये प्रसारमाध्यमांची मंत्रालयाने वेळ ही सकाळी ११ वाजता प्रवेशासाठी ठेवली आहे. परंतु, वकिलांची प्रवेश वेळ सर्वसामान्य जनतेप्रमाणे दुपारी दोनची ठरवण्यात आलेली आहे.
राज्याचा विधी व न्याय विभाग, सामाजिक न्याय विभाग यांची महत्वाची कार्यालये मंत्रालयाच्या इरमारतीत आहेत. न्यायपालिकेतील महत्त्वाचा घटक म्हणून वकिलांची मंत्रालयीन प्रवेश वेळ बदलून सकाळी अकरा वाजता सुरू करण्यात यावी, असे विनंतीपत्र सुभाष पगारे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com