
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून तळोजा भुयारी मार्गाची पाहणी
खारघर, ता. २५ (बातमीदार) : तळोजा भुयारी मार्गातील गळती रोखण्यासाठी लवकरच उपाययोजना केली जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
तळोजा भुयारी मार्गात पाच ते सहा वेळा पाणी भरल्यामुळे तळोजा वसाहतीमधील रहिवाशांना तीन किलोमीटर अंतर पार करून पेंधर रेल्वे फाटक आणि उड्डाणपूलमार्गे ये-जा करावे लागले होते.
भुयारी मार्गात पाणी भरल्यामुळे खारघरवरून तळोजा वसाहतीत धावणाऱ्या एनएमएमटी बस बंद होत असल्यामुळे रहिवाशांना शीघ्र कृती सेंटर ते तळोजा वसाहत जवळपास एक ते दोन किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे. शिवाय शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्यामुळे रहिवासी रेल्वेच्या ढिसाळ कामकाजासंदर्भात नाराज असल्याची बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास येताच पनवेल येथील रेल्वे कार्यालतील अधिकारी संजीव कुमार यांनी शुक्रवारी पाहणी केली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते राजीव सिन्हा, अंकुश गायकवाड उपस्थित होते. संजीव कुमार म्हणाले, की भुयारी मार्गात होणाऱ्या गळतीमुळे पाणी भरत आहे. पाऊस कमी होताच गळती रोखण्याचे काम केले जाणार असून, पाणी भरणार नाही असे काम केला जाईल असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.