कंटेनरच्या धडकेमुळे महावितरणचे ४९ हजारांचे नुकसान
अंबरनाथ, ता. २५ (वार्ताहर) : अंबरनाथ एमआयडीसी परिसरात कंटेनर चालकाच्या निष्काळजीमुळे महावितरणला मोठा आर्थिक फटका बसला आहे. एका कंटेनरने उच्चदाब वाहिनीच्या खांबाला आणि त्यावरील रोहित्राला जोरदार धडक दिल्याने अंदाजे ४९ हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २३ ऑगस्टला रात्री साडेआठच्या सुमारास माऊली वजन काट्याजवळ घडली. चालक सुनील शुक्ला (वय ४८) हा त्याच्या ताब्यातील कंटेनर मागे घेत असताना वाहनावरील ताबा सुटला. त्याने थेट महावितरणच्या खांबाला धडक दिली. या धडकेमुळे खांब व रोहित्राचे मोठे नुकसान झाले. फुरकान अली यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी शुक्लाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.