उड्डाणपुलावरील खड्ड्यामुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने !
खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावली
उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
अंबरनाथ ता. २६ (वार्ताहर) ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सज्ज असलेले शहर मात्र खड्ड्यांच्या विळख्यात सापडले आहे. यंदाही गणरायाचे आगमनही खड्ड्यांतूनच होणार असल्याची परिस्थिती शहरात असताना सोमवारी (ता. २५) कल्याण-बदलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. उल्हासनगरच्या दिशेने बदलापूरमार्गे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अंबरनाथ रेल्वेस्थानक परिसराला जोडणारा हा उड्डाणपूल मुख्य वाहतुकीचा मार्ग मानला जातो, मात्र याच पुलावरील डांबरीकरण उखडल्याने खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांचे संतुलन बिघडून अपघाताच्या घटना घडत आहेत. अशातच, या पुलावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दुपारनंतर तर मटका चौक ते हुतात्मा चौक अशा वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. कामावर जाणारे आणि गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बाहेर पडलेले नागरिक सर्वचजण या कोंडीत अडकून पडल्याचे पाहायला मिळाले.
वाहनांच्या एक ते दीड किलोमीटर रांगा
संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास मटका चौकातून वाहतूक कोंडी झाल्याने कल्याण-बदलापूर मार्गावर याचा परिणाम झाला होता. त्यामुळे मार्गावर एक ते दीड किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालक चांगलेच हैराण झाले होते. मागील तीन ते चार दिवसांपासून शहरात हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.