राज्य क्रीडा धोरण बदलण्याची कल्याण मधून मागणी
राज्य क्रीडा धोरण बदलण्याची कल्याणमधून मागणी
क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना निवेदन
कल्याण, ता. २६ (बातमीदार) : राज्यातील क्रीडा धोरणात सुधारणा करून २०२५ पासून नवीन धोरण आखण्याची मागणी होऊ लागली आहे. राज्य सरकार क्रीडा धोरण समितीचे सदस्य आणि कल्याणचे क्रीडा प्रशिक्षक अविनाश ओंबासे यांनी नुकतीच क्रीडा व शिक्षण मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेत त्यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. २०१२ साली आखलेल्या धोरणानंतर आता आधुनिक काळाच्या गरजेनुसार नव्या धोरणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
२००१ व २०१२ मध्ये क्रीडा धोरण निश्चित करण्यात आले होते. आताच्या काळात क्रीडा क्षेत्रात मोठे बदल झाले असल्याने क्रीडा धोरणाचे पुनरावलोकन करणे गरजेचे असून, नव्या पिढीसाठीच्या क्रीडा संधी, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, आणि सुविधा यांचा समावेश होण्यासाठी पुनर्रचना करण्याची आवश्यक असल्याचे ओंबासे यांनी म्हंटले आहे. क्रीडा धोरण समितीची बैठक घेऊन नव्या धोरणाची प्रक्रिया वेगाने पुढे नेण्याचे आवाहनही यावेळी कोकाटे यांच्याकडे करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्यासाठी मार्गदर्शक
क्रीडाक्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्यासाठी हे धोरण मार्गदर्शक ठरेल. विविध स्तरांवर खेळाडूंना प्रोत्साहन आणि सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचे धोरणाचे मुख्य उद्दीष्ट आहे. क्रीडा धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असले तरीही केरळ, पंजाबसारखे राज्य आता अग्रेसर होत असून महाराष्ट्र मागे राहत आहे. त्यामुळे सरकारने गंभीरपणे यावर लक्ष देऊन नवे क्रीडा धोरण राबविल्यास राज्यातील प्रत्येक गाव, खेड्यात आणि सर्व घटकांपर्यंत त्याचा उपभोग घेता येईल, असे यावेळी अविनाश ओंबासे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.