बाधितांच्या पंचनाम्याला सुरुवात
बाधितांच्या पंचनाम्याला सुरुवात
माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या प्रयत्नाला यश
विरार, ता. २८ (बातमीदार) : मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत जनजीवन विस्कळित झाले. अनेक घरांत पाणी शिरले. रहिवासी, बागायतदार यासह मच्छीमार बांधवांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाने मदत करावी, यासाठी बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला यश आले असून, ठिकठिकाणी पंचनामा करण्यास तहसील विभागाने सुरुवात केली आहे.
पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे व्यापारी, कारखानदार तसेच मच्छीमार, बागायतदार शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकर पंचनामे करून कार्यवाही सुरू करावी, अशी विनंती केली. अतिवृष्टीच्या काळात बहुजन विकास आघाडी, महापालिका व जीवदानी मंदिर ट्रस्टतर्फे जेवणाची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना जेवण दिले. माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी अनेक भागांत दौरे करून समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले तसेच नुकसानभरपाईची मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.