निर्माल्यापाससून खत निर्मिती
निर्माल्यापाससून खतनिर्मिती
पालिकेच्या २४ वॉर्डात ३७ सेंद्रिय खत प्रकल्प सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहे. उत्सव काळात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये भक्तिभावाने गणरायाची पूजाअर्चा केली जाते. उत्सवात मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या निर्माल्यापासून पालिकेच्या वतीने खतनिर्मिती केली जात आहे. २४ वॉर्डात खतनिर्मिती प्रकल्प सुरू केल्याची माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईत यंदा सव्वा लाख घरगुती मंगलमूर्ती गणरायाच्या मूर्तींची तसेच सुमारे १२ हजार सार्वजनिक मूर्ती प्रतिष्ठापना झाली आहे. मंबई शहर आणि उपनगरांत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गणरायाचा रोज पाहुणचार केला जातो. दररोज पूजाअर्चा केली जाते. नैवेद्य दिला जातो. मूर्तीच्या अवतीभवती फुलांची आरास, हार घातले जातात. याचे दुसऱ्या दिवशी निर्माल्य होते. हे निर्माल्य पालिकेतर्फे गोळा केले जाते. त्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे.
निर्माल्य कचऱ्यात टाकू नका!
मुंबई महापालिकेने गणेशोत्सव काळात सर्व मंडळे तसेच घरगुती गणपती भाविकांना निर्माल्य संकलनासाठी आवाहन केले आहे. बाप्पाला वाहिलेली फुले, हार, पत्री यामुळे मोठ्या प्रमाणावर निर्माल्य तयार होत असून, ते थेट कचऱ्यात टाकण्याऐवजी वेगळे करून पालिकेकडे सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इतर टाकाऊ वस्तूंसाठी वेगळा डबा ठेवा!
महापालिकेच्या निर्माल्य संकलन वाहनांमार्फत हे निर्माल्य जमा करण्यात येणार असून, त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची कार्यवाही केली जात आहे. त्यासाठी प्रत्येक मंडळाने निर्माल्य साठवण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी, तसेच खतासाठी वापरता न येणारे पदार्थ वेगळ्या डब्यात जमा करावेत, अशा सूचनाही पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा
विसर्जन स्थळांवर पालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या निर्माल्य कलशांचा वापर करून योग्य पद्धतीने निर्माल्याची विल्हेवाट लावावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाची समस्या सुटण्यास मदत होत असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
३७ सेंद्रिय खत प्रकल्प
गेल्या वर्षी गणेशोत्सव काळात तब्बल ५५० मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले होते. हे निर्माल्य महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांत असलेल्या ३७ सेंद्रिय खत प्रकल्पांमध्ये नेऊन खतनिर्मितीसाठी वापरण्यात येत आहे.
५०० निर्माल्य कलश
मुंबईत ५०० हून अधिक निर्माल्य कलश विसर्जन स्थळांवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्या कलशातील निर्माल्य दररोज जमा केले जाणार आहे. त्यातील निर्माल्यही खतनिर्मितीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.