गणरायाला भावपूर्ण निरोप
गणरायाला भावपूर्ण निरोप
खारघर, ता. २८ (बातमीदार): ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’, अशा गजरात खारघरवासीयांनी दीड दिवसाच्या गणरायाला गुरुवारी भावपूर्ण निरोप दिला. रिमझिम पावसाच्या सरींमध्ये विसर्जन सोहळ्याने परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
सकाळपासून पावसाचे अधूनमधून जोरदार सत्र सुरू होते. त्यामुळे भक्तांनी दुपारी पावसाला उसंत मिळेल, अशी अपेक्षा ठेवली होती, मात्र दुपारी एकच्या सुमारास अखेर सततच्या पावसातच विसर्जनाला सुरुवात झाली. खारघरमधील नैसर्गिक तसेच कृत्रिम तलावांत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. खारघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील दीड दिवसांच्या सुमारे २,५०० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पालिकेकडून खारघरगाव, बेलपाडा, पापडीचा पाडा, मुर्बी गाव आणि विविध सेक्टरमध्ये कृत्रिम तलाव उभारण्यात आले. विसर्जन स्थळी मंडप, टेबल, विद्युत व्यवस्था, ध्वनिप्रसारक यंत्रणा तसेच सुका व ओला निर्माल्याचे वेगळे संकलन करण्याची सोय करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.