शाळांनी संस्कार रोपणाची जबाबदारी उचलणे काळाची गरज

शाळांनी संस्कार रोपणाची जबाबदारी उचलणे काळाची गरज

Published on

विद्यार्थ्यांना नैतिक मुल्य शिक्षणाची नितांत आवश्यकता
पालघर, ता. २८ (बातमीदार) : मुल्य शिक्षण आणि नैतिक शिक्षण यातील फरक सांगून आजच्या स्पर्धेच्या युगात ताणतणावाखाली शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना या नैतिक मुल्य शिक्षणाची नितांत आवश्यकता असण्यावर त्यांनी भर दिला. विद्यार्थ्यांनी प्रलोभनांना बळी न पडता निती मुल्यांच्या आधारित शिक्षणाने जबाबदार नागरिक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निसर्गाने जसे आपल्या समोर चांगले व वाईट ठेवले आहे तसेच माणूस म्हणून सद्सदविवेक बुध्दीही दिली आहे त्यानुसार आपल्याला योग्य काय याची निवड आपण करायची आहे. कोणाकडूनही फुकट काही न घेता या ना त्या मार्गाने उपकारांची परतफेड कायम करायला हवी याची त्यांनी जाणीव करुन दिली.
शिक्षणाने मुलं शिक्षित होतील परंतू शहाणी होतीलच असे नाही. शिक्षणातून तो माणूस बनण महत्वाचे आहे. चारित्र्यवान, सुविद्य, सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी नैतिक मुल्यांची जोपासना करणारे शिक्षण देणे ही आजची गरज आहे नव्हे त्यास पर्याय नाही हेच सिद्ध होते असे त्यांनी सांगितले. डॉ. शशिकला पोतनीस कला व वाणिज्य महाविद्यालय, कोसबाड येथील मराठी वांग्मय मंडळामार्फत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.अंजली मस्करहेन्स संस्थेचे माजी अधिकारी दिलीप अंबिके उपस्थित होते.

फोटो- मिननाथ अंबिके विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com