पटनी मैदानात पाणी साचून तळ्याची निर्मिती
पटनी मैदानात पाणी साचून तळ्याची निर्मिती
खेळाडूंचा उत्साह ओसरला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
वाशी, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक खेळाच्या मैदानांमध्ये पाणी साचून तळी तयार झाली आहेत. परिणामी, मुलांना खेळण्यासाठी योग्य जागा उरलेली नाही. शहरातील बहुतेक मैदानांत डबकी निर्माण झाल्याने खेळ थांबले आहेत. काही मुले या पाण्यात मजा घेताना दिसत आहेत, मात्र या परिस्थितीमुळे आरोग्याचा धोका वाढला आहे.
सिडको प्रशासनाच्या नियोजनानुसार प्रत्येक सेक्टरमध्ये उद्याने आणि खेळाची मैदाने उपलब्ध आहेत, पण त्यांची देखभाल आणि विकासकामे रखडल्याने या सुविधा नागरिकांना अपुऱ्या प्रमाणात मिळत आहेत. बहुतेक मैदाने खोलगट असल्याने तिथे पाणी साचते, तर उंच भागात गवत वाढले आहे. या पाणथळ भागामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून मलेरिया आणि डेंगीसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. ऐरोलीतील पटनी मैदान, सेक्टर-४ मधील सुशिलादेवी देशमुख विद्यालय परिसर, सेक्टर १३ दिवा गाव आणि तळवली येथील खदान तलावाजवळील मैदान अशी अनेक ठिकाणे सध्या पाण्याखाली आहेत. नागरिक उमेश दिवटे यांनी प्रशासनाकडे तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे. त्यांनी पाणी साचलेल्या मैदानांवर कीटकनाशक फवारणी करून डासांचा नायनाट करावा आणि नागरिकांना रोगराईपासून वाचवावे, असे आवाहन केले आहे. मैदानांची योग्य देखभाल, पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था आणि गवत साफ करण्याची मोहीम तातडीने हाती घ्यावी अन्यथा पावसाळ्यात खेळासाठीची मैदाने तळी बनतील आणि आजारांचे संकट आणखी गडद होईल, असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.