ग्रामीण भागात गौरी-गणपतींचे विसर्जन

ग्रामीण भागात गौरी-गणपतींचे विसर्जन

Published on

ग्रामीण भागात गौरी-गणपतींचे विसर्जन
‘पुढच्या वर्षी लवकर या’चा घोष; साश्रुनयनांनी निरोप

किन्हवली, ता. २ (बातमीदार) : ग्रामीण भागात गौराई आणि गणपतीचे विसर्जन एकाच दिवशी करण्याची प्रथा असून, यंदाही हा पारंपरिक सोहळा भक्तिभावाने पार पडला. मंगळवारी (ता.२) सातव्या दिवशी, गौराईला दुपारपर्यंत व गणरायाला सायंकाळी भक्तांनी साश्रुनयनांनी निरोप दिला.

ग्रामीण भागात दरवर्षी गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी गौराईचे आगमन होते. यंदा मात्र गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशीच गौराई आल्यामुळे, परंपरेनुसार गणरायाचे विसर्जन पुढे ढकलण्यात आले.
गौराईचे पूजन करून, तिसऱ्या दिवशी दुपारी गावातील महिलांनी आणि मुलींनी पारंपरिक पद्धतीने ओढ्याच्या पाण्यात गौराईचे विसर्जन केले.

अग्निशिखा व फुलांच्या वेलींची गौराई
पारंपरिक ग्रामीण संस्कृतीनुसार, अग्निशिखा, वेल्या व फुलांची जुडी तयार करून त्यातून गौराईची मूर्ती साकारली जाते. तिची षोडशोपचार पूजाअर्चा करण्यात येते. पूजेनंतर महिलांकडून तिचे विसर्जन गावाच्या बाहेरील नैसर्गिक प्रवाहात शेताच्या ओढ्यात किंवा पाणवठ्यावर केले जाते.

ढोल-ताशांचा गजर
संध्याकाळी ढोल-ताशांचा निनाद, टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. ग्रामीण भागातील पारंपरिक आणि सामूहिक विसर्जन सोहळ्याने वातावरण भक्तिमय झाले.

छायाचित्र
किन्हवली -:१) गौराईचे विसर्जन करण्यासाठी निघालेल्या महिला
२) ओढ्याच्या प्रवाहात गौराईचे विसर्जन करताना महिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com