जूचंद्र गावची अनोखी परंपंरा

जूचंद्र गावची अनोखी परंपंरा

Published on

जूचंद्र गावची अनोखी परंपरा
विरार, ता. २ (बातमीदार) : वसईतील जूचंद्र गाव हे तसे सर्व कलांनी परिपूर्ण असे गाव आहे. या गावात घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जातो. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे विसर्जनाच्या वेळी सर्व गणपती एका रांगेमध्ये गावातील तलावावर येतात. त्यानंतर त्याठिकाणी सामुदायिक आरती केली जाते आणि त्यानंतर गणपतीचे विसर्जन केले जाते. आजही सायंकाळी ६ वाजता गणपती व गौरी घरातून निघाले आणि ६.३० वाजता गणपतीची सामुदायिक आरती झाल्यावर गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
तलाव पाळीवर सामुदायिक आरतीने विसर्जन करण्याची १४३ वर्षांची परंपरा आजही सुरू आहे. आजही सायंकाळी वाजत-गाजत श्रींची मिरवणूक काढण्यात आली. गणपती डोक्यावर घेतलेले पुरुष आणि गौरीला डोक्यावर घेतलेल्या महिला साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. आजमितीस गावातील १४५ घरांमध्ये श्री गणपतीची व १९ घरांमध्ये गौरी मातेची प्रतिष्ठापना केली जाते. पूजाविधीसाठी जूचंद्र धार्मिक सेवा संस्थेच्या वतीने श्रींच्या मिरवणुकीची व सामुदायिक आरतीची व्यवस्था केली जाते. विशेष म्हणजे गावची श्रींची विसर्जन परंपरा फक्त तीन वेळा आहे. १) दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन २) गौरी गणपतींचे एकत्रित विसर्जन ३) अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रींच्या विसर्जन सोहळ्याला संध्याकाळी ६ वाजता श्री दत्तमंदिराजवळून मिरवणुकीने प्रारंभ होतो. ६.३० वाजता मिरवणूक तलाव पालीवर येते. तद्नंतर सामुदायिक आरतीला प्रारंभ होतो. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत श्रींचा विसर्जन सोहळा संपन्न होतो. अवघ्या एका तासाचा हा जूचंद्र गावचा श्रींचा विसर्जन सोहळा पाहण्यासारखा असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com