सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या फायबरच्या मूर्ती
वसई विरारमधील मंडळाच्या मूर्ती फायबरच्या
पर्यावरण संतुलन करण्यावर भर
विरार ता.(बातमीदार) : पर्यावरण रक्षण आणि पर्यावरण संतुलनाचे आवाहन शासन दर वेळी करत असते. त्याच बरोबर मोठ्या गणपतीच्या पीओपी च्या मूर्ती तलावात विसर्जीत करण्यास न्यायालयाने बंदी केल्याने वसई आणि विरार मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आता फायबरच्या मोट्या मूर्ती तयार करून घेतल्या असून त्या मूर्ती फक्त विसर्जन मिरवणुकीत फिरवल्या जातात आणि पुन्हा आणून पुढच्या वर्षासाठी जपून ठेवल्या जात आहेत. या मूर्तीच्या माध्यमातून समाजाला पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात येत आहे. वसई मधील साईनगर गणेशोत्सव मित्र मंडळ व विरार येथील ओम शिव साईधाम गणेश उत्सव मित्र मंडळ यांनी मोठ्या फायबरच्या मूर्ती कायम स्वरूपी बनविल्या आहेत.
वसईतील साईनगर गणेशोत्सव मित्र मंडळाला ४२ व्या वर्ष झाली आहेत. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांना जे अभिप्रेत असं समाजसेवा करत असताना मंडळाची फायबरची गणपतीची मूर्ती आहे ती गेले पाच वर्ष झालं विसर्जन केली जात नाही. पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्याचा हा मंडळाचा प्रयत्न आहे. याच्यामध्ये मोठी जी मूर्ती असते तिची मिरवणूक काढली जाते मिरवणूक काढल्यानंतर ती मूर्ती पुन्हा मंडपात येते आणि जी छोटी मूर्ती असते ती शाडूची मूर्ती आहे. त्या शाडूच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्याचबरोबर मंडळाचा जो आत्मदत्त देखावा आहे या प्रत्येक वर्षी सामाजिक बांधिलकीचा देखा दाखवला जातो यावर्षी देखील वायु प्रदूषण ही एक समस्या यावरती देखावा मंडळांनी सादर केलेला आहे . यामध्ये वायु प्रदूषणामुळे होणारे जे काही शारीरिक रोग होतात किंवा पर्यावरणाला कसा त्रास होतो हे दाखवण्यात आलेले असून वायू प्रदूषणावर जर मात करायची असेल तर आपण काय करायला पाहिजे याबद्दलचे सगळी माहिती बाहुली तसेच ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहे.
पालघर जिल्ह्यातील विरार येथील ओम शिव साईधाम गणेश उत्सव मित्र मंडळ कारगील मनवेल पाडा विरार पुर्व या मंडळाने ९ वर्षांपूर्वी साडेबारा फूट उंचीची फायबरची गणपतीची मूर्ती बनविली आहे. त्याला सवा लाख रुपये खर्च आला होता. ह्या मूर्तीची विसर्जनाच्या वेळी मिरवणूक काढण्यात येते. आणि नंतर ती पुन्हा आणून पुढच्या वर्षासाठी जपून ठेवली जाते. तर २ फुटाची इकोफ्रँकली शाडू च्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते या सार्वजनिक मंडळा तर्फे सामाजिक आणि शैक्षणिक असे विकविध कार्यक्रम घेतले जात आहेत मी. मंडळाचे अध्यक्ष हे मनीष राऊत असून सचिव मनोज राऊत,खजिनदार राजू शिंदे व सल्लागार तरंग पाटील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.