कळवा खाडी प्रदूषित
कळवा खाडी प्रदूषित
कृत्रिम तलावातील माती खाडी परिसरात
ठाणे, ता. ३ (बातमीदार) : गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिकेने कृत्रिम तलाव उभारून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला असला, तरी कळवा खाडी परिसरात विसर्जनानंतर गंभीर प्रदूषणाचे चित्र समोर आले आहे. विसर्जित झालेल्या गणेशमूर्तींची विरघळलेली माती, रंगीत ॲक्रेलिक रंगाचे तुकडे, मणी आणि मूर्तीचे अवशेष कचऱ्यासारखे ढिगाऱ्यात टाकल्याचे आढळून आले.
पूर्वी पारंपरिक पद्धतीने खाडीत मूर्ती विसर्जन केले जात होते. मात्र महापालिकेच्या सूचनेनुसार आता पाच फुटांपर्यंतच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित होत आहेत. खाडीतले प्रदूषण टाळण्यासाठी पोलिसांनी आणि महापालिका प्रशासनाने विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्त ठेवला होता. खाडीमध्ये विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना या वेळी रोखले जात होते. पण आता कृत्रिम तलावामध्ये विसर्जित केलेल्या मूर्तींचे अवशेष आणि माती खाडी परिसरात टाकण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या मूर्तींच्या मातीची विटंबना होत असल्याने भाविक नाराज आहेत.
स्थानिक कोळी बांधवांनी महापालिका पर्यावरण रक्षणाची भाषा करते, पण विसर्जित मूर्तींच्या मातीची विटंबना थांबवत नाही, असा आरोप केला. गेल्या ५० वर्षांपासून कळवा खाडीत कंपन्यांचे सांडपाणी सोडले जात असून, त्यामुळे मासेमारीच बंद होण्याच्या स्थितीत आली आहे. कृत्रिम तलाव असूनही जर विसर्जनानंतर मूर्तींची विटंबना होणार असेल तर त्याचा उपयोग काय, असा संतप्त सवाल स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी देवदास कोळी यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.