भीषण कार अपघातात तीन ठार
भीषण कार अपघातात तीन ठार
शहापूर, ता. ३ (वार्ताहर) : शहापूर तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा गावच्या हद्दीत कार अपघातात तिघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात मंगळवारी (ता. २) रात्री मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर घडला.
रियाज हैसियत अली, असादुल्लाह आणि अफजल अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. हे तिघेही मुंबईहून नाशिककडे निघालेल्या मालवाहू ट्रकचे चालक होते; मात्र मालवाहू ट्रकसोबतचे दुसरे चालक ट्रक चालवीत पुढे निघाले असल्याने हे तिघे ढाब्यावर जेवण करून मित्राच्या हुंदाई कारमधून पुढे चाललेल्या ट्रकच्या मागे निघाले होते. त्या वेळी कसारा गावाजवळच्या वळणावर कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने ही भरधाव कार रस्त्याकडेच्या मोठ्या खडकावर आदळली. विशेष म्हणजे या भरधाव कारमधून कारचालकाने अपघातापूर्वीच उडी घेऊन स्वतःचा बचाव करून पळ काढला; मात्र यामध्ये कारमधील तिघे जण ठार झाले. या अपघातातील रियाज हैसियत अली हा जागीच ठार झाला, तर असादुल्लाह आणि अफजल या दोघांचा खर्डी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेतील फरार कारचालकाचा शोध सुरू असल्याची माहिती कसारा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश कदम यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.