अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई द्या
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई द्या
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कल्याण पूर्वेतील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या नागरिकांसाठी त्वरित भरपाई देण्याची मागणी केली आहे. १८ व २० ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शिवाजीनगर, अशोकनगर आणि वालधुनी परिसरातील घरांमध्ये पाणी घुसले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष विक्रम शिंदे यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची विनंती केली.
तहसीलदारांनी लवकरच पंचनामे करून नागरिकांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. या भागात काही ठिकाणी तलाठ्यांनी सर्वेक्षण केले असून, नागरिकांना कोरे फॉर्म भरायला सांगितले आहेत. अनेक ठिकाणी अजूनही नुकसानाचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून त्वरित शासकीय मदत देण्याचा आग्रह राष्ट्रवादीने केला आहे.
अतिवृष्टीमुळे या सखल भागात घरांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक लोकांचे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांचे जीवन विस्कळित झाले आहे. या भागातील नागरिकांनीही शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी पक्षाने या भागातील नागरिकांच्या वेदना समजून त्यांना न्याय मिळावा यासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच या विषयावर शासनाने वेळीच योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या वेदना लक्षात घेऊन त्वरित नुकसानभरपाईची प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.