कोकणवासीयांचे एसटीकडून सारथ्य
अलिबाग, ता. ४ (वार्ताहर)ः गौरी-गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या कोकणवासीयांसाठी एसटीच्या रायगड विभागातील आठ आगारांमधून अतिरिक्त बसची व्यवस्था केली आहे. त्यानुसार ३ सप्टेंबरला ५२५, तर ४ सप्टेंबरला १२५ अतिरिक्त गाड्या धावल्या.
गणेशोत्सव काळात पूजाआर्चा, आरती, भजनातून गणरायाला सातव्या दिवशी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणरायाकडे पुढच्या वर्षी लवकर, या असा आग्रह धरून कोकणवासीय पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मुंबई उपनगर, ठाणे, डोंबिवली परिसरातील नागरिक पुन्हा घराकडे निघाले आहेत. त्यामुळे परतीच्या प्रवासात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी प्रशासनाने अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केली आहे.
---------------------------------
जलवाहतूक बंद
कोकणात गणेशोत्सवासाठी एसटीने पाच हजारांहून अधिक बस सोडल्या होत्या. त्यामुळे रायगडमधील बसस्थानकांतील वर्दळ वाढली आहे. गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर अनेक जण खासगी वाहनांनी मुंबईकडे निघाले आहेत. बुधवारी सकाळपासूनच एसटी आगारासह अलिबाग-वडखळ मार्गावरही वाहनांची गर्दी दिसून आली, तर जलवाहतूक बंद असल्याने अनेकांनी एसटी बसला पसंती दिली.
-------------------------------
इतर जिल्ह्यांमधून तजवीज
रायगड जिल्ह्यातील आठ आगारांतून ३ सप्टेंबरला तब्बल ५२५ अतिरिक्त बस सोडण्यात आल्या. शिवाय ४ सप्टेंबरलादेखील १२५ बस सोडण्यात आल्या. यासाठी इतर जिल्ह्यांमधून बसची तजवीज करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार जास्त गाड्या सोडण्यात येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.