कामाचे तास वाढल्याने कामगारांमध्ये असंतोष
कामाचे तास वाढल्याने कामगारांमध्ये असंतोष
राज्य सरकारच्या निर्णयाला होणार विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः राज्य सरकारने खासगी क्षेत्रातील उद्योगांमध्ये कामाचे तास नऊवरून १२ तास करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने खासगी क्षेत्रात असंतोष निर्माण झाला असून, त्याला विरोध होत आहे.
उद्योग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. कारखाने अधिनियम १९४८ च्या कलम ६५ मध्ये कामगारांच्या दैंनदिन कामाच्या तासांची मर्यादा नऊ तास होती. ती आता १२ तासांपर्यंत करण्यात आली आहे. या निर्णयाचे पडसाद खासगी क्षेत्रात उमटू लागले आहेत. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्याचा निर्धार विविध कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे.
---------------
केंद्र आणि राज्य सरकार जुलमी, शोषण आणि भांडवलदारी व्यवस्था निर्माण करीत आहेत. १८७० पासून कामगारांनी लढून मिळवलेले कायदे हे सरकार मोडून काढत आहे. कौटुंबिक व्यवस्था उद्ध्वस्त करीत आहेत.
- प्रकाश रेड्डी, नेते, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
--
राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे. कामगार उपनगरात रहात असल्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तीन तास आणि तीन घरी जाण्यासाठी जातात. घटनेने दिलेले अधिकार हे सरकार काढून घेत आहे.
- मिलिंद रानडे, कामगार नेते
--
राज्य सरकारने घेतलेला कामाचे तास वाढविण्याचा निर्णय चुकीचा आहे. आज खासगी क्षेत्रासाठी निर्णय घेतला, उद्या केंद्र, राज्य सरकार निमसरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही या निर्णयाची अंमलबजावणी होईल.
- बाबा कदम, अध्यक्ष, म्युनिसिपल कामगार सेना
--
राज्य सरकारने घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. भांडवलदारी व्यवस्था आणून कामगारांची पिळवणूक करण्याचे सरकारचे धोरण आहे.
- रमेश जाधव, कामगार नेते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.