टीईटीच्याविरोधात शिक्षक परिषदेचा आंदोलनाचा इशारा
टीईटीविरोधात शिक्षक परिषदेचा आंदोलनाचा इशारा
कल्याण, ता. ७ (वार्ताहर) : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षकवर्गात तीव्र नाराजी आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार, टीईटी उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांना सेवा सोडावी लागू शकते, असा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बालशिक्षण हक्क कायदा, २००९ लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या आणि पाच वर्षांपेक्षा कमी सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना या निर्णयातून वगळले आहे; मात्र इतर हजारो शिक्षकांना पुढील दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे, अन्यथा त्यांना सेवानिवृत्ती स्वीकारावी लागेल, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. १३ फेब्रुवारी २०१३च्या शासन निर्णयानंतर नियुक्त शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य केली होती. त्यापूर्वी अशा अटी नव्हत्या. त्यामुळे अनेक शिक्षकांना धक्का बसला असून, त्यात अन्याय झाल्याची भावना शिक्षक परिषदेने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या अध्यक्षतेखाली एक तातडीची ऑनलाइन बैठक घेण्यात आली. बैठकीत माजी शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आढावा घेतला आणि भविष्यातील कायदेशीर वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
संघटनेमार्फत केंद्र आणि राज्य सरकारकडे लवकरच निवेदन दिले जाणार असून, कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य पर्याय शोधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय राज्यव्यापी आंदोलनाची तयारीही सुरू असल्याची माहिती कोकण विभागाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.