मुर्ती पुर्नप्रकिया कागदावर

मुर्ती पुर्नप्रकिया कागदावर

Published on

मूर्ती पुनर्प्रक्रिया फक्त कागदावरच
ठाणे पालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

सकाळ वृत्तसेवा
ता. ७ : ठाणे महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा नारा दिला असला, तरी कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित झालेल्या गणेशमूर्तींच्या पुनर्प्रक्रियेसंबंधी कोणताही ठोस कृती आराखडा अस्तित्वात नाही. त्यामुळे मूर्तींची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे फक्त आश्वासन देण्यात आले असून, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही, हे खुद्द महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच मान्य केले आहे. गणेशमूर्तींची शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्प्रक्रिया करण्याचे आश्वासन प्रशासनाने उच्च न्यायालयाला देण्यात आले होते, पण यासंबंधातील कृती आराखडा किंवा यंत्रणा उपलब्ध नसल्याने मूर्ती प्रनर्प्रक्रिया कागदावरच राहिली आहे.

गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर नैसर्गिक पाण्याचे स्रोत प्रदूषित होत आहेत. त्यामुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहोचत असल्याचा मुद्दा उपस्थित करत पर्यावरणप्रेमींनी पीओपी मूर्तींवर बंदी आणण्यासाठी चळवळ उभी केली आहे. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य सरकारने आणि त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांनी पीओपी मूर्त्यांना बंदी घातली, पण त्याविरोधात मंडळे आणि मूर्तिकारांनी आंदोलन केल्यामुळे ही योजना बारगळली. शाडू मातीसोबत पीओपी मूर्त्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या आणि घरोघरी, मंडळांमध्ये स्थापित झाल्या, पण पीओपीला दिलासा देताना राज्य सरकारने उच्च न्यायालयाला मूर्ती विल्हेवाट किंवा पुनर्प्रक्रियेची हमी दिली होती.

खाडी, समुद्रात किंवा तलावासारख्या नैसर्गित स्रोतात मूर्ती विसर्जित केल्यानंतर २४ तासांत त्या बाहेर काढण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले, पण ही जबाबदारी राज्य शासनाने पालिकेच्या खांद्यावर टाकली. दरम्यान, मूर्त्यांवर प्रक्रिया करताना काकोडकर समितीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ती करण्याची शिफारस करण्यात आली.

अंमलबजावणी अशक्य
मूर्त्यांवर प्रक्रिया करून ते पुनर्वापरात आणण्याची तयारी सुरुवातीला ठाणे महापालिकेने दाखवली. बारीवडे येथे मूर्त्या एकत्र करून नंतर त्याचे सीएमडी प्रकल्पांतर्गत विघटन करण्याची योजना होती, पण ही सर्व प्रक्रिया खर्चिक असून, त्यापासून तयार होणाऱ्या वस्तूला बाजारभाव नसल्याने ठाणे महापालिकेने हा प्रकल्प यावर्षी सुरू न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ठाणे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

याचिका दाखल करणार
कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन हा केवळ पैशांना चुराडा आहे. मूर्ती परत खाडीत टाकणार असाल किंवा जमिनीत दफन करणार असाल, तर ही सर्व यंत्रणा निव्वळ धूळफेक आहे. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. यावर्षीही हेच वास्तव पाहायला मिळत असून, सर्व पुरावे छायाचित्रांसह जमा करण्यात आले आहेत. यासाठी आरटीआयअंतर्गत माहितीही मागवून पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे माहिती पर्यारवणप्रेमी, अभ्यासक रोहित जोशी यांनी दिली आाहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com