सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?
कामाचे १२ तास करण्याचा निर्णय अन्यायकारक
कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचा संतप्त
कल्याण, ता. ८ (वार्ताहर) : राज्य सरकारने खासगी क्षेत्रातील कामगारांचे कामाचे तास आठवरून १२ तास केल्याचा ठराव मंजूर केला आहे. यामुळे उद्योगपती कंपनी मालकांची सुपारी घेऊन कामगारांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा विडा सरकारने उचलला आहे काय, असा गंभीर आरोप कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे.
सरकारी उपक्रम उद्योगपतींना विकण्याचा सपाटा केंद्रातील सरकारने लावला आहे. यात सर्वसामान्य कामगारवर्गाची आर्थिक पिळवणूक सुरू आहेच. सगळे कामगारांच्या हक्काचे कायदे मोडणाऱ्यांना अभय देणारे सरकार आहे. अशात फडणवीस, शिंदे, पवार सरकारने खासगी संस्थेतील कामगारांना कामाचे १२ तास करण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला. आज दळण-वळणाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. रेल्वे वाहिनी तर मरण वाहिनी झाली आहे. रेल्वे प्रवास गर्दीमुळे असुरक्षित झाला. कसारा-कर्जतवरून लोकलने सामान्य प्रवासी मुंबईला पोहोचायला चार तास लागतात.
नोकरीच्या ठिकाणी आठ तास काम केल्यावर पुन्हा परतीच्या प्रवासाला पाच तास म्हणजे घरातून सकाळी बाहेर पडल्यावर तो चाकरमानी पुन्हा घरी १८ तासांनी पोहोचतो. आता त्यात आणखी जादा चार तासांची भर पडली, तर घराबाहेर २२ तास असेल. किमान सहा तास झोप माणसाला आवश्यक आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची मागणी संघटनेचे सरचिटणीस श्याम उबाळे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.