२४ तासांत तब्बल १२० मिमी पाऊस
पालघर, ता. ७ : धो धो पडणाऱ्या पावसाने पालघर जिल्ह्याला चांगलेच झोडपले. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तब्बल १२० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. जिल्ह्याला गेले दोन दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने दिला होता. ऐन गणेशोत्सवात कोसळलेल्या पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. जोरदार पावसामुळे विसर्जन घाटावर मंदगतीने विसर्जन होत होते, तर जनजीवन विस्कळित झाले. जोरदार पावसामुळे सर्व रस्त्यांवरील वाहतूक मंदावल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार होती, मात्र शनिवारी (ता. ६) सकाळपासून ढगाळ वातावरण आणि जोरदार पाऊस होता. सप्टेंबरमध्ये पावसाची जिल्ह्यातील सरासरी ७४.४ मिमी आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १२०.५ मिमी पाऊस पालघर जिल्ह्यात कोसळला, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
मुसळधार पावसाने डहाणू, वाडा, पालघर, तलासरी, विक्रमगड या तालुक्यांना चांगलेच झोडपले. दरम्यान, वसई, जव्हार आणि मोखाडा तालुक्यांत पावसाचा जोर कमी राहिला. २४ तासांमध्ये विक्रमगडमध्ये १८१.३ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद होती. त्याखालोखाल डहाणूमध्ये १५६.४ मिमी, वाडा १४८, पालघर १२१, तलासरीमध्ये १२७ मिमी पावसाची नोंद झाली. वसईमध्ये ९५.८, जव्हार ५१.८, तर मोखाडा तालुक्यात ४८.२ मिमी पावसाची नोंद झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.