९३५ सेस इमारतींबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
९३५ सेस इमारतींबाबत आज
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : म्हाडा कायदा ‘कलम ७९ अ’ अंतर्गत म्हाडाने मुंबई शहरातील जवळपास ९३५ इमारती अतिधोकादायक ठरवून त्या रिकाम्या करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. त्या नोटिसीला उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून त्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणी म्हाडाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सोमवारी (ता. ८) सुनावणी होणार आहे. म्हाडा न्यायालयात काय बाजू मांडणार, न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई शहरातील जुन्या उपकरप्राप्त (सेस) इमारतींची डागडुजी म्हाडाकडून केली जाते; मात्र अनेक इमारती दुरुस्तीपलीकडे गेल्याने म्हाडाने जवळपास ९३५ इमारती अतिधोकादायक जाहीर करून त्या रिकाम्या करण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असता इमारती धोकादायक ठरवण्याचे म्हाडाच्या अधिकार क्षेत्रात नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे म्हाडाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.