जनसुरक्षा नव्हे जनता दडपशाही विधेयक : वल्ली राजन
जनसुरक्षा नव्हे जनता दडपशाही विधेयक : वल्ली राजन
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : महाराष्ट्रात आणलेलं हे विधेयक नावाने जनसुरक्षा असलं तरी प्रत्यक्षात हे जनतेच्या सुरक्षेपेक्षा सरकारच्या खुर्चीची सुरक्षा करण्यासाठी आहे. त्यामुळे जनसुरक्षा विधेयक की जनता दडपशाही विधेयक, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते वल्ली राजन यांनी उपस्थित केला आहे.
लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला प्रश्न विचारण्याचा, आंदोलन करण्याचा आणि शासनाविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. पण, या विधेयकामुळे जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणं गुन्हा ठरेल. भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणं गुन्हा ठरेल. सरकारला जबाबदार धरणं गुन्हा ठरेल. म्हणजेच, लोकशाही वाचवण्यासाठी उभं राहणं हेच लोकशाहीविरोधी ठरणार आहे. हे सरकार सुरक्षेच्या नावाखाली जनतेचा आवाज दाबण्याचा कट रचत आहे.
हे विधेयक स्वीकारणं म्हणजे आपल्या भविष्यातील पिढ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणं. महाराष्ट्राची जनता गुलाम नाही, ती कधीच गुलाम होणार नाही. जनसुरक्षा नव्हे, ही तर जनतेची गळचेपी आहे. महाराष्ट्राचं लोकशाहीवरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न जनता रस्त्यावर उतरून मोडून काढेल, असे मत वल्ली राजन यांनी व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.