स्वच्छ हवेसाठी ठाणेकरांना साद

स्वच्छ हवेसाठी ठाणेकरांना साद
Published on

स्वच्छ हवेसाठी ठाणेकरांना साद
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा प्रयत्नशील
ठाणे, ता. १४ : वायू प्रदूषण कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारावी, यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा प्रयत्नशील असतात; मात्र या अभियानात नागरिकांचाही सक्रिय सहभाग आवश्यक आहे. घरच्या घरी कचऱ्याचे नियोजन, सार्वजनिक वाहनांचा वापर, वृक्षारोपण तसेच संवर्धन अशा अनेक गोष्टींतून हे साध्य करणे शक्य आहे, असा विश्वास व्यक्त करीत स्वच्छ हवेसाठी ठाणेकरांना साद घालण्यात आली.
ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने शुक्रवारी (ता. १२) स्वच्छ हवा आणि पर्यावरण जनजागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कोणतेही अभियान जेव्हा नागरिकांमार्फत पुढे नेले जाते तेव्हाच त्याला यश मिळते, असे या वेळी अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेतर्फे महाविद्यालय व शाळा यांच्यामध्ये माझी वसुंधराअंतर्गत ई प्रतिज्ञा आणि त्यांची पूर्तता या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा या वेळी त्यांनी केली. तर राज्य शासनाच्या सूचनेनुसार ठाणे महापालिका स्वच्छ हवा कृती आराखडा तयार करीत असल्याची माहिती पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.

मान्यवरांकडून मार्गदर्शन
राज्य हवामान कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांनी नागरी क्षेत्रासाठी हवामान कृती आराखडा याबद्दल मार्गदर्शन केले. नागरी भागातील आव्हाने आणि त्यांचा सामना करण्यासाठी योजण्यात आलेल्या उपायांची माहिती त्यांनी दिली. तर नागरी विभागातील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी रस्त्यांची स्थिती, वाहतूक व्यवस्थापन, बांधकामांचे नियोजन आदी उपाययोजना आवश्यक असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे विभागाचे उप प्रादेशिक अधिकारी संजीव रेडासनी यांनी सांगितले. महावितरण कंपनीतील कार्यकारी अभियंता अविनाश रणदिवे आणि सहाय्यक अभियंता किशोर सावरकर यांनी सौरऊर्जेचा वापर वाढवण्याची आवश्यकता सांगितली. सोमय्या महाविद्यालयातील पर्यावरण विभागप्रमुख डॉ. नीलेश वाघ यांनी नागरी सहभागाचे महत्त्व विशद केले.

पर्यावरणपूरक स्पर्धेचा निकाल
या कार्यशाळेत विविध पर्यावरणपूरक स्पर्धांत पारितोषिके मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कचऱ्यापासून कलानिर्मिती या गटात अर्थव पवार, रुचिता पांचाळ, विराट काटे, निविदा पगार यांना पारितोषिक मिळाले. शाडू मातीपासून मूर्ती बनवण्याच्या गटात निविदा पगार, विहान सपकाळ, रुचिता पांचाळ यांना पारितोषिक मिळाले. बीजगोळे निर्मिती स्पर्धेत कृतिका घोलप, आदित्य चाकोले, निर्मला राठोड यांना पारितोषिक मिळाले. तसेच कागदी लगद्यापासून मूर्ती बनविण्याच्या स्पर्धेत संघपाल कांबळे, रिया खरात, सिद्धेश चव्हाण यांना पारितोषिक मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण दूत म्हणून गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com