शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत तोकडी : बच्चू कडू

शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत तोकडी : बच्चू कडू

Published on

शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत तोकडी : बच्चू कडू
जुईनगर, ता. ९ (बातमीदार) : पावसाने उद्ध्वस्त झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत खूपच कमी असून, तो शेतकऱ्यांवर अन्याय आहे, असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी नवी मुंबई दौऱ्यादरम्यान व्यक्त केले.
त्यांनी सांगितले की, नदीकाठची शेती वाहून गेली असून, मोठे खड्डे पडले आहेत; ती नऊ हजार रुपये प्रति हेक्टर मदतीने शक्य नाही. सरकारने मोठी आकडेवारी जाहीर करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले आहे. ३१ हजार कोटींच्या पॅकेजमधील १० हजार कोटी रुपये पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहेत, जे नियमितच आहे. २०१३च्या इतकीच मदत देऊन सरकारने ‘सर्वात मोठे पॅकेज’ दिल्याचा आव आणला आहे, अशी टीका त्यांनी केली. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रहार जनशक्ती पक्ष लढणार असून, ते जनतेसोबत निवडणूक लढवतील. शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठीची हक्कयात्रा सुरूच राहील, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com