शेतकरी मेटाकुटीला...
शेतकरी मेटाकुटीला
बोर्डी, ता. १५ (बातमीदार) : गतवर्षी झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई तांत्रिक अडचणींचे कारण देत रखडवण्यात येत असल्याने बागायतदार आणि शेतकरीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ‘गतवर्षीच्या आर्थिक नुकसानीची भरपाई तांत्रिक अडचणीमुळे रखडली’ या मथळ्याखाली मंगळवार (ता. १४) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या. गेल्या वर्षभरापासून ॲप अपग्रेड सुरू आहे, सिस्टीममध्ये बिघाड आहे किंवा केवायसी पूर्ण नाही, अशा सबबींमुळे भरपाईचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
शासनाच्या या डिजिटल कार्यपद्धतीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, लोकप्रतिनिधी मात्र गप्प बसले आहेत, अशी टीका बागायतदारांनी केली आहे. सोमवार (ता. १३) रोजी बागायतदार सावे यांनी तलासरी तालुक्याचे नायब तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निधी वाटपातील अडचणींबाबत चौकशी केली. मात्र त्यांनाही तांत्रिक अडचण असल्याचेच सांगण्यात आले. सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेची ही भोंगळ कार्यप्रणाली दिवाळीपूर्वी सुधारावी आणि शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा करावी, अशी मागणी बागायतदारांकडून जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.