विक्रमगड परिसरात पारंपरिक दिवाळीला सुरवात

विक्रमगड परिसरात पारंपरिक दिवाळीला सुरवात
Published on

विक्रमगड (बातमीदार) : आधुनिक काळामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार अनेकविध बदल झाले आहेत, परंतु विक्रमगड परिसरातील खेड्या-पाड्यांत आजही पूर्वापार चालत आलेली परंपरा जोपासली जात असून त्यानुसार सण साजरे केले जात आहेत. विक्रमगड व ग्रामीण भागात सर्वच सण पारंपरिक पद्धतीनेच साजरा केला जातात. आठविदे म्हणजे मुख्य दिवाळीपासून सुमारे सहा दिवस अगोदरपासूनच दिवाळीची सुरुवात केली जाते. हा आठविंदे हे मंगळवारी (ता. १४) साजरे करण्यात आले. या दिवशी सायंकाळी महिला घरासमोरील अंगण झाडून साफ करून ते सारविले जाते. अंगणात सायंकाळच्या सुमारास लाकूड पेटवून तयार होणाऱ्या राखेपासून आठविंदे काढले जातात. आठविंदे म्हणजे थोडक्यात कनगे व मानवी आकृत्या. ग्रामीण भागात पूर्वीपासून चालत आलेली ही एक परंपरा जोपासून दारासमोर कनगे काढून त्याची पूजा करतात. याचा उद्देश म्हणजे घरात अन्नधान्यांची कधी कमरता पडू नये व धान्य कणग्याप्रमाणे भरभरून राहिले पाहिजे. अशा प्रकारे आठविंदे काढून त्यांची विधिवत पूजा करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com