शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार नुकसानभरपाई

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार नुकसानभरपाई

Published on

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार नुकसानभरपाई
८७५ हेक्टर भातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण

कल्याण, ता. १६ (वार्ताहर) : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण तालुक्यातील भात शेतीचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीक हिरावले गेल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने युद्धपातळीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल तयार केला असून, दिवाळीपूर्वी त्यांना नुकसानभरपाई मिळणार असल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे.

अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनाम्याचे काम जलद गतीने हाती घेण्यात आले. या कामासाठी ४० तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि गट विकास अधिकारी अशा ९० अधिकारी-कर्मचारी यांच्या पथकाने काम केले. या पथकाने अवघ्या १२ दिवसांत तालुक्यातील एकूण ३,०६७ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण केले. अहवालानुसार, ८७५ हेक्टर भात पिकांचे नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे आणि याद्या तयार करून त्या शासनाकडे तातडीने सुपूर्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com