यंदाची दिवाळी आरोग्यमंत्र्यांच्या दारी
यंदाची दिवाळी आरोग्यमंत्र्यांच्या दारी
आरोग्य कर्मचाऱ्यांचा इशारा; आरोग्य भवन, मंत्रालयावर मोर्चा काढणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : महाराष्ट्रातील सुमारे ३९ हजार राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत कर्मचारी तीन महिन्यांपासून पगाराशिवाय काम करत आहेत. दिवाळी जवळ आली असून, प्रशासकीय विलंब आणि निष्काळजीमुळे पगार रोखण्यात आल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. थकीत पगार न मिळाल्यास आरोग्यमंत्र्यांच्या दाराशी दिवाळी साजरी करून आरोग्य भवन आणि मंत्रालयावरही मोर्चा काढण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला.
‘या अधिकाऱ्यांना निर्णय घेण्यासाठी की फायली रोखण्यासाठी नियुक्त केले गेले, हे समजत नाही. हे अधिकारी मंत्र्यांचेही ऐकत नाहीत. ते स्वतःच्या मर्जीने निर्णय घेतात, अशी नाराजी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या एकत्रीकरण समितीचे राज्यप्रमुख विजय गायकवाड यांनी व्यक्त केली. जर दिवाळीपूर्वी निर्णय झाला नाही, तर सर्व एनएचएम कर्मचारी आरोग्य भवन आणि मंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करतील. १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून पैसे मंजूर झाले नाहीत, तर आंदोलन राज्यव्यापी करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
..................................
‘ई-स्पर्श’मुळे डोकेदुखी
राज्य सरकारने नवीन ई-स्पर्श संगणक प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, दिवाळीपर्यंत ती तयार झालेली नाही. या तांत्रिक बिघाडामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पगार अडकला आहे, अशी तक्रार कर्मचारी करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.