पंतप्रधानांकडून आत्महत्या करण्याची परवानगी आंदोलन

पंतप्रधानांकडून आत्महत्या करण्याची परवानगी आंदोलन

Published on

सामूहिक आत्महत्येसाठी पंतप्रधानांना परवानगी पत्र
वसईतील महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे ग्रामस्थ त्रस्त
बोळिंज, ता. १६ (बातमीदार) ः विरार-अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या वसईतील बोळिंज परिसरातील गावकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले आहे. जीवघेण्या परिस्थितीला कंटाळून, नागरिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सामूहिक आत्महत्येची परवानगी मागितली आहे.
घोडबंदर-गायमुख घाटावरील कामे आणि महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे. यामुळे गावातील मुले शाळेत जाऊ शकत नाहीत, तसेच नागरिक वेळेवर कामावर पोहोचू शकत नाहीत. वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याचेही नागरिकांनी पत्रात नमूद केले आहे.
‘भूमिपुत्र संघटने’ने पुढाकार घेत हे आंदोलन केले असून, महिला आणि लहान मुलांसह सुमारे एक हजारांहून अधिक पत्रे पंतप्रधानांना पाठवण्यात आली आहेत. ‘असे जीवन जगण्यापेक्षा आत्महत्या बरी’ अशी हताश भावना व्यक्त करत, त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक तक्रारी आणि विनंत्या करूनही प्रशासनाकडून कोणतीच ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडूनही अपेक्षा सोडली आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com