तांदळाच्या ६९१ 
गाेण्या जळून खाक

तांदळाच्या ६९१ गाेण्या जळून खाक

Published on

तांदळाच्या ६९१
गाेण्या जळून खाक

रोहा, ता. २० (बातमीदार) : दिवाळीत सरकारी धान्यवाटप करण्यासाठी सरकारी गोदामातून धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागून तांदळाच्या ६९१ गाेण्या जळून खाक झाल्या. यात ३४५ क्विंटल तांदूळ हाेता. रविवारी मध्यरात्री १२:३० वाजता भुवनेश्वर गाव परिसरातील शासकीय गोदामाच्या आवारात घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
भुवनेश्वर येथे शासकीय गोदामाच्या आवारात रविवारी धान्याने भरलेला ट्रक उभा हाेता. दिवाळीच्या सुट्टीत चालक गावी गेला होता. रविवारी मध्यरात्री अचानक ट्रकला आग लागली. घटनेनंतर नायब तहसीलदार राजेश थोरे यांच्या समवेत संबंधित खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर धाटाव एमआयडीसी येथील अग्निशमन दलाला पाचरण केले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
-----
राेहा : गोदामाच्या आवारात धान्याच्या ट्रकला रविवारी आग लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com