कॉलम

कॉलम

Published on

दिवाळीत आदिवासी कुटुंबांना मिठाईवाटप
विरार (बातमीदार) : जव्हार, मोखाडा, डहाणू, विक्रमगड, वाडा तालुक्यांच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या सुमारे चार हजार १०० कुटुंबांना दिवाळीनिमित्त विश्व हिंदू परिषद कोकणप्रांतचे रामस्वरूप अग्रवाल, रामलाल बगाडिया ट्रस्टचे देवकीनंदन बगाडिया, अजय पडीया परिवार यांनी मिठाई वाटप केले. गेली ४१ वर्षे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या जूचंद्र येथील शिव छत्रपती समाज सेवा मंडळानेही नागरिकांचा आनंद द्विगुणीत केला. तसेच भूषण पुरुषोत्तम पाटील परिवारातर्फे लहान मुलांना बिस्कीटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मंडळाचे संस्थापक पुरुषोत्तम पाटील, मिलिंद पाटील, धर्माजी म्हात्रे, विद्याधर भोईर, किशोर पाटील, प्रताप भोईर, केदारनाथ पाटील, मेघनाथ पाटील, अनिल असारे यांचे सहकार्य लाभले.
---
मनेश पाटील यांना ग्रामरत्न सरपंच पुरस्कार
वाडा (बातमीदार) : तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य मनेश पाटील यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने ग्रामरत्न सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सहा प्रशासकीय विभागातील ग्रामपंचायतींमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंच व उपसरपंचांचा ग्रामरत्न सरपंच पुरस्कार सन्मान सोहळा पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे २५ व २६ ऑक्टोबरला आयोजित केला होता.

परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील हे या कार्यक्रमाचे आयोजक होते. या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित यशदाचे संचालक व माजी सनदी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे व अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामरत्न सरपंचांचा गौरव करण्यात आला. पाटील यांनी अडीच वर्षांच्या त्यांच्या काळात आपल्या गावात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. आरोग्य स्नेही गाव ही संकल्पना राबवून गावातील सार्वजनिक स्वच्छता व ग्रामस्थांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष पुरविले. घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प राबून शेकडो टन प्लॅस्टिकवर पुनर्प्रक्रिया केली. गावातील तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करणारी चिंचघर ही एकमेव ग्रामपंचायत आहे. त्यांच्या कारकिर्दीत चिंचघर ग्रामपंचायतीला आयएसओ नामांकन मिळाले आहे.
---
शेतकऱ्यांना सरसकट भरपाई मिळावी
विक्रमगड (बातमीदार) : सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांना पीक नुकसानीची सरसकट भरपाई मिळावी व शासन स्तरावर तसे आपण प्रयत्न करावे, असे भाजप विक्रमगड तालुकाध्यक्ष रवींद्र भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. या वेळी पक्षाचे तालुका सरचिटणीस निशिकांत संखे, कोषाध्यक्ष राहुल मोरे, कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ माळी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com