महाराजांचे विचार आचरणात आणले पाहिजेत!

महाराजांचे विचार आचरणात आणले पाहिजेत!

Published on

विरार, ता. २९ (बातमीदार) ः मनात असेल, तर घराघरात बसेल शिवराय, हा दृष्टिकोन अंगी बाळगा. पुढच्या पिढीला घडवायचं असेल तर केवळ महाराजांचे विचार मनात नाही, तर प्रत्यक्षात आचरणात आणले पाहिजेत, असे परखड विचार दुर्गकन्या हमिदा खान यांनी वसईत काढले. सिद्धनाथ सामाजिक व शैक्षणिक संस्था प्रायोजित वसई तालुका पत्रकार संघ आयोजित किल्ले उभारणी व देखावा आणि ऑनलाइन रांगोळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, माजी नगरसेविका किरण चेंदवणकर, सिद्धनाथ सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष राजेश्री बाबर, राजाराम बाबर, माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम, विवेक पाटील, विजय काशिळकर, सुनील मुळ्ये, मंगेश म्हस्के उपस्थित होते. हमिदा खान म्हणाल्या, की मी गेली ३५ वर्षे दुर्ग, गडकिल्ले, विविध शिवकालीन संग्रह यांची भटकंती करीत आहे. माझे मन शिवराय आणि त्यांच्या ४२५ वर्षांपासून उभ्या असलेल्या किल्ल्यांकडे वळत गेले. केवळ भारत नव्हे, तर संपूर्ण जगात त्यांच्या पराक्रमाची, शौर्याची गाथा गायली जाते. महाराजांची दूरदृष्टी आणि त्यांच्या कार्याची जाण ठेवण्यासाठी आपण सामाजिक बांधिलकी जोपासून दरवर्षी दिवाळीला एका तरी किल्ल्यावर दिवा, पणती लावा आणि किल्ले प्रकाशित करा, हीच खरी दिवाळी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com