अतिवृष्टीमुळे पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी
अतिवृष्टीमुळे पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी
मुरूड, ता. २९ (बातमीदार) ः मुरूड तालुक्यात पावसाची अतिवृष्ठी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भात शेतीची कापणी काही ठिकाणी सदरची पिके पावसात भिजली आहेत. तर शेतामधील उभे पीक पावसामुळे आडवे झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी सरसकट पंचनामे करून शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मुरूड तहसीलदार आदेश डफळ यांच्याकडे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हा उपप्रमुख भरत बेलोसे व शिवसेनेचे नेते विघ्नेश माळी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे बांधकाम कामगार सेनेचे मुरूड तालुका अध्यक्ष दिनेश मिणमिने, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपेश वरणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे नेते विघ्नेश माळी यांनी तहसीलदार यांच्यासोबत चर्चा करताना सांगितले की, मुरूड तालुक्यात अतिवृष्टीमुळे रस्त्याची संरक्षक कठडे, डोंगराचा भाग पडू नये म्हणून बांधण्यात आलेली संरक्षक भिंत, शेतीवरचे बांध वाहून गेले आहेत. त्यामुळे आपत्कालीन निधी प्राप्त होण्यासाठी शासनाकडून आपला अहवाल पाठवण्यात यावा, अशी मागणी केली. तर शिवसेनेचे रायगड जिल्हा उपप्रमुख भरत बेलोसे यांनी पावसाचे प्रमाण वाढले असून आजसुद्धा मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. सरसकट पंचनामे करून त्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

