अंभई ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण
वाडा (बातमीदार) ः आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाडा तालुक्यातील अंभई गावच्या ग्रामस्थांनी मंगळवार (ता. २८)पासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गावात असलेल्या एका खासगी कंपनीत स्थानिक कामगारांना डावलण्यात येत असून स्थानिकांना या कंपनीत प्राधान्य देण्यात यावे, अंभई ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारात चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच आमगाव येथे ग्रामस्थांची फसवणूक सरकारी निधीतून तयार करण्यात आलेले रस्ते खोदून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विनापरवाना रस्ते खोदणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नरेश पाटील, मनोज गोवारी, गोंविदा कातारे व विलास बरड या ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहील, असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

