कोळीवली गावाच्या प्रवेशद्वाराजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी
कोळीवली गावाच्या प्रवेशद्वाराजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी
कर्जत, ता. ३० (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील नेरळ-कशेळे-खांडस हा राज्य मार्ग अत्यंत वर्दळीचा म्हणून ओळखला जातो. या मार्गालगत कोळीवली गावाचे मुख्य प्रवेशद्वार आहे; मात्र या ठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहनधारक अतिवेगाने वाहन चालवत असून, अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरेश सोनावळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
या मार्गावर दिवसभर वाहतूक सुरू असते. शाळकरी मुले, नोकरदार, शेतकरी आणि वयोवृद्ध नागरिक यांना हा मार्ग ओलांडताना प्रचंड धोका निर्माण होतो. प्रवेशद्वारापासून काही अंतरावरच वस्ती असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो, असे सोनावळे यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत या ठिकाणी अनेक किरकोळ तसेच गंभीर अपघात घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यासंदर्भात अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक प्रशासनाकडे लेखी मागण्या करण्यात आल्या असूनही आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. सोनावळे यांनी याबाबत पुन्हा एकदा प्रशासनाला लेखी निवेदन सादर करून दोन ठिकाणी योग्य अंतरावर गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे. जर तातडीने कार्यवाही झाली नाही, तर पुढील अपघातांसाठी प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कोळीवली ग्रामस्थांनी या मागणीला एकमुखाने पाठिंबा दर्शवला असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित निर्णय घेण्याची मागणी सर्वत्र जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

