ऐन दिवाळी शिक्षकांचा अभ्यास

ऐन दिवाळी शिक्षकांचा अभ्यास

Published on

शहापूर, ता. ३ (वार्ताहर) : दिवाळीचा सण आनंदाचा असला तरी यंदा शिक्षकांसाठी तो अभ्यासाचा ठरला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी जवळ आल्याने ठाणे जिल्ह्यातील शिक्षक आणि इच्छुक उमेदवार दिवसरात्र अभ्यासात गुंतले आहेत. ऐन सुट्टीच्या काळातही पुस्तके, नोट्स आणि प्रश्नसंचांच्या संगतीत गेली. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या टीईटी परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल चार लाख ७५ हजार शिक्षकांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे सव्वा लाखाने नोंदणी वाढल्याने स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.

टीईटी परीक्षा येत्या २३ नोव्हेंबरला होणार आहे. पहिली ते पाचवीसाठी पेपर १ आणि सहावी ते आठवीसाठी पेपर २ असे दोन पेपर होणार आहेत. डीएड पास उमेदवारांबरोबर नोकरीला असलेले शिक्षकही या परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ज्यांची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी आहे, अशा शिक्षकांना परीक्षेत सवलत देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय १ सप्टेंबरला आला होता. या निर्णयात पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना निर्णयाच्या तारखेपासून दोन वर्षांत कार्यरत शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे.

ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील अनेक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी वाढली आहे. टीईटी ही शिक्षक पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता परीक्षा असल्याने प्रत्येक उमेदवाराकडून यश मिळविण्यासाठी कसोशीने तयारी सुरू आहे. अनेक शिक्षक स्वतःच्या नोकरीनंतर वेळ काढून या परीक्षेचा अभ्यास करत आहेत. काहींनी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला आहे. मराठी, इंग्रजी, गणित, पर्यावरणशास्त्र या विषयांतील मूलभूत ज्ञान आणि अध्यापन तंत्रांवर भर देत उमेदवार सराव प्रश्नपत्रिका सोडवत आहेत. यंदा ऑनलाइन मार्गदर्शन, यू-ट्युब क्लासेस आणि टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी अनुभव शेअर केले जात आहेत. राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटी परीक्षा पुढील महिन्यात म्हणजे २३ नोव्हेंबरला होत आहे. पुढल्या कालावधीत शिक्षक पदासाठी मोठी भरती प्रक्रिया अपेक्षित असल्याने उमेदवारांचा उत्साह अधिक वाढला आहे.

अशी असेल टीईटी परीक्षा
शिक्षक पात्रतेसाठी पहिला पेपर पहिली ते पाचवीसाठी आणि दुसरा पेपर सहावी ते आठवीच्या शिक्षकांसाठी असेल. १५० गुणांच्या या पेपरमध्ये खुल्या प्रवर्गातील शिक्षकांसाठी किमान ६० आणि राखीव प्रवर्गासाठी ५५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com